‘टाटा-मिस्त्री’ यांच्यातील 70 वर्षाचे जुने संबंध तुटले, मिस्त्रींना द्यावे लागू शकतात 1.40 लाख कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शापूरजी पालोनजी ग्रुप (एसपी ग्रुप) म्हणजेच मिस्त्री परिवारने म्हटले आहे की, आता टाटा सन्समधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. ज्यानंतर हे ७० वर्षांपूर्वीचे संबंध संपतील, ज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून कडवटपणा आला होता. एसपी समूहाने एका निवेदनात म्हटले की, “७० वर्षीय शापूरजी पालनजी-टाटा संबंध परस्पर विश्वास, सद्भावना आणि मैत्रीवर आधारित होते.”

कंपनी म्हणाली, “शापूरजी पालोनजी समूहाने सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले कि टाटा समूहाचे वेगळे होणे या कायम खटल्याचा जीवन आणि अर्थव्यवस्थेवर संभावित परिणामामुळे आवश्यक आहे.” याचा अर्थ असा आहे की, एसपी समूह जो टाटा सन्समध्ये दोन गुंतवणूक कंपन्यांमार्फत १८.४ टक्के हिस्सा ठेवतो, आपला हिस्सा विकण्यास आणि कंपनीतून बाहेर पडण्यास तयार आहे.

एसपी समूहाने म्हटले आहे की, ते टाटा समूहातून बाहेर पडतील, त्याबदल्यात त्यांना लवकर आणि न्यायपूर्ण मिळेल. याच दरम्यान टाटा समूह मिस्त्री कुटुंबाच्या टाटा सन्समधील १८.५ टक्के हिस्सा खरेदी करण्यास तयार झाला आहे.

मिस्त्रींना द्यावे लागू शकतात १.४० लाख कोटी
टाटा समूहाला टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाचा १८.४ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी सुमारे १.४० लाख कोटी रुपये द्यावे लागतील. जून २०२० च्या कॉर्पोरेट फायलिंगनुसार, टाटा सन्सची एकूण संपत्ती ७,८०,७७८.२ कोटी रुपये आहे. हे नेटवर्थ कंपनीकडे सध्याच्या भागभांडवलातून येते. मिस्त्री कुटुंबातील १८ टक्के शेअर्सची किंमत १.४० लाख कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे. मात्र अंतिम मूल्यमापन इतर अनेक मूल्यमापनानंतर निश्चित केले जाईल.

कधी सुरु झाला वाद ?
सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही गटातील वकिलांनी हा वाद लवकर सोडवण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्यानंतर हा वाद लवकरच सोडवला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या वादाची सुरुवात २०१६ मध्ये झाली, जेव्हा पालोनजी मिस्त्री यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून काढून टाकले गेले होते. तेव्हापासूनच दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. यावर्षी जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाने National Company Law Appellate Tribunal च्या सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्षपद पुन्हा स्थापण्याच्या आदेशावरून स्थगिती दिली होती.