सामन्यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या टीम इंडियाच्या ‘सुपरफॅन’चं निधन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लड येथे गेला होता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. या सामान्यांच्या दरम्यान प्रेक्षकांच्यात बसलेल्या एका आजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चर्चेत आलेल्या ८७ वर्षीय आजी टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा उत्साह एखाद्या तरूणीला लाजवेल इतका होता. ‘चारुलता पटेल’ असे या आजींचे नाव. मात्र १३ जानेवारी रोजी या टीम इंडियाच्या फॅनचे निधन झाले. चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं ही बातमी दिली.
https://www.instagram.com/p/B7TTtSyJm6X/?utm_source=ig_web_copy_link
कॅप्टन कोहलीने घेतली होती भेट –
वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुतला या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती. आणि त्यांचा आशीर्वादही घेतला होता. त्यामुळेच त्या सामन्यानंतर चारुलता पटेल यांची खूप चर्चा रंगली होती. तसेच बांगलादेशनंतरच्या सामन्याचे तिकीट देणार असे कोहलीने चारुलता पटेल यांना कबुल केले होते. कोहलीने तो शब्द पाळला देखील होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचे तिकीट कोहलीने चारूलता यांना दिले होते. त्या सामन्यानंतरही सोशल मीडियावर चारुलता पटेल यांचीच चर्चा रंगली होती.
चारुलता यांच्या नातीने केले ट्विट
चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं त्यांच्या निधनाची बातमी दिली. तिने ट्विट केले आहे की, “तुम्हाला कळवण्यात दुःख होतं की, आमच्या आजीने १३ जानेवारीला सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला”, अशी माहिती त्यांच्या नातीने दिली.
#TeamIndia's Superfan Charulata Patel ji will always remain in our hearts and her passion for the game will keep motivating us.
May her soul rest in peace pic.twitter.com/WUTQPWCpJR
— BCCI (@BCCI) January 16, 2020
बीसीसीआयने केले ट्विट
बीसीसीआय ने देखील चारुलता यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. “टीम इंडियाच्या सुपरफॅन चारुलता पटेलजी नेहमीच आपल्या हृदयात राहील आणि त्यांची खेळाबद्दलची आवड आम्हाला सतत प्रेरित करीत राहील”, अशा आशयाचे ट्विट बीसीसीआय ने केले आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –