कांगारूंना धुळ चारल्यानंतर ‘या’ गाण्यांवर थिरकली टीम इंडिया

सिडनी : वृत्तसंस्था – भारतीय संघाने कांगारुंना पहिल्यांदाच त्यांच्याच मैदानावर कसोटी सामन्यात मात दिली. हा विजय ऐतिहासिक विजय आहे. त्यामुळे या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय संघ कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीत. कांगारुंना धुळ चारून मैदानात विजय मिळवल्यानंतर त्यांनी तिथं तर आनंद व्यक्त केला.

मैदानातून हॉटेलमध्ये परतल्यानंतर तेथे संघाचं स्वागत वाजतगाजत झालं. त्यावेळी भारतीय संघ बॉलिवूडच्या इतर गाण्यांसह ‘ मेरे देश की धरती…’ या गाण्यावरही ठेका धरला आणि आनंद व्यक्त केला आहे. त्यांचा हा व्हीडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरून शेअर केला. यात चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, इशांत शर्मा, कोच रवी शास्त्रीदेखील दिसत आहेत.

भारतीय संघाने या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे कांगारूंवर मात करण्यात यश आलेच. या विजयाने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत मोठे यश संपादन केले आहेच.

दरम्यान, या ऐतिहासिक विजयामुळे सर्वत्र भारतीय संघाचे कौतुक होत आहे. तसंच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.