तरुणीने दाखल केली सामूहिक बलात्काराची तक्रार, तपासातून समोर आला धक्कादायक प्रकार

पोलीसनामा ऑनलाईनः एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्या तरुणीला शोधून काढले. ती एका निर्जन स्थळी पोलिसांना सापडली. त्यावेळी तीने माझ अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता धक्कादायक माहिती समोर आली. तेलंगनातल्या घाटकेसरमध्ये घडलेल्या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहे. सखोल तपास आणि तांत्रिक पुराव्यांमुळे तरुणीने कथन केलेला प्रकार घडल्याच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित तरुणीने संपूर्ण कथा रचून पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कौटुंबिक कारणांमुळे तरुणीला घर सोडून जायचे होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. तरुणीला घर सोडून जायचे होते. मात्र तरुणी बेपत्ता झाल्याने या सगळ्यात पोलिसांची एंट्री झाली. त्यामुळे अस्वस्थ झाल्याने तरुणीने एक वेगळीच कथा रचली आणि ती पोलिसांना सांगितली.

माझ अपहरण झाल असून चार रिक्षा चालकांनी माझ्यावर बलात्कार केल्याचे तीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी 10 पथक तयार केली होती. तपासातून मात्र वेगळीच माहिती समोर आली. संबंधित तरुणीचे रिक्षा चालकाशी भांडण झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी तिने या सगळ्यात त्याचे नाव गोवण्याचा प्रयत्न केल्याचे भागवत यांनी सांगितले. तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दाखल केली होती. रिक्षा चालकान आर. एल. नगरला रिक्षा थांबवलीच नाही आणि आपल अपहरण केल्याचे संबंधित तरुणीने घरी फोन करून सांगितले. यानंतर तिचा फोन नॉट रिचेबल झाला. पोलिसांनी तरुणीच मोबाईल लोकेशन आणि त्या भागातील सीसीटीव्ही तपासले. रिक्षा चालकांच्या युनियनची मदत घेतली. त्यानंतर मुलगी पोलिसांना सापडली. मात्र तिचे दावे आणि पुरावे जुळत नव्हते. त्यानंतर तरुणीने हा सगळा बनाव असल्याची कबुली पोलिसांना दिली.