उमरिया : वृत्तसंस्था
मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे हे भाजपचे तत्त्व आहे. राम मंदिर बांधू असे सांगतात आणि मंदिर बांधतात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामाचे. हिंदू महासभेने ग्वाल्हेरच्या दौलतगंज भागात नथुराम गोडसेचे मंदिर बांधले आहे. भाजपा खासदार साक्षी महाराज सांगतात की नथुराम गोडसे आमचा आदर्श आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? असा प्रश्न विचारात काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22087f72-b250-11e8-ac66-55a64f8945b6′]
मध्यप्रदेशातील उमरिया येथे झालेल्या सभेत सिंधिया बोलत होते. ते म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की भाजपाला राम मंदिराची आठवण येते. भाजपाचे नेते असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत ते कायम विकास विकास असे भजन करताना दिसतात. मात्र एक लक्षात घ्या देशात जो काही विकास झाला आहे तो काँग्रेसमुळेच झाला आहे. भाजपाच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात काय झाले हे तुम्ही पाहाताच आहात.
मध्यप्रदेशात निवडणुका जवळ आल्याने भाजपाला लोकांची आठवण झाली आहे. त्यांना तुमच्या समस्यांशी काहीही घेणेदेणे नाही. ते फक्त विकासाच्या गोष्टी करतात. प्रत्यक्षात त्यांना कोणतेही काम करायचे नाही तर फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे असेही सिंधिया यांनी म्हटले आहे.
जाहीरात