ब्रेकिंग : देशभरातील सर्व टोल वसुली तात्तपुरत्या काळासाठी स्थगित : नितीन गडकरी

वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात काल पासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशाला 21 दिवसासाठी लॉकडाउन केले आहे. दरम्यान आताच आलेल्या वृत्तानुसार केंद्रीय रस्ते वाहुतक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतभरातील सर्व टोल तात्तपुरत्या काळासाठी स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आपत्कालीन सेवा पुरवठ्यात येणारी गैरसोय तर कमी होईलच शिवाय वेळेची बचत होईल असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.