PAK कडून RSS चा हिंसक राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेख; UNSC मध्ये केली बंदी घालण्याची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पाकिस्तानकडून परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही एक हिंसक राष्ट्रवादी संघटना आहे असा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ( UNSC) व्यासपीठाचा उपयोग भारतविरोधी प्राचारासाठी आणि बेजबाबदार व्यक्तव्यांसाठी केला आहे. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचीही मागणी केली. तसेच पाकिस्तानने भाजपा आणि काश्मीरबाबतही संयुक्त राष्ट्रांत अनेक खोटी वक्तव्य करत, त्यांच्यावर आरोप केले आहे.

संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे राजदूत मुनिर अकरम यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जगभरातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवादी संघटना असा उल्लेख करण्याची मागणी केली. तसेच आपल्या भाषणा दरम्यान भाजपा आणि हिंदू-मुस्लीम यावरही त्यांनी वक्तव्य केलं आहे. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारावर आणि त्यांच्या परिस्थितीवर काहीही बोलण्यात आलेले नाही.

भाजपा ही हिंदुत्वाची विचारधारा मानते. भाजपाकडून आपल्या देशातील मुस्लिमांना धमक्याही देण्यात येतात,” असं वक्तव्यही मुनीर अकरम यांनी यावेळी केलं. तसंच हिंसक राष्ट्रावादाचा उदय रोखण्यासाठी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यावेळी सूचनाही केल्या. पाकिस्ताननं आपल्या सूचनांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे सर्व राष्ट्रांनी आपल्या देशातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवागी संघटना म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच या संघटनांच्या विचारधारा, त्यात होणारी भरती आणि आर्थिक मदतीवरही तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच यावेळी पाकिस्तानकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख करण्यात आला. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवाही हिंसक समुहांमध्ये सामील करण्यासाठी १२६७ प्रतिबंध समितीचा विस्तार करायल हवा,” असंही अकरम म्हणाले. यावेळी त्यांच्याकडून आपल्या देशातील दहशतवाद सोडून बाकी सर्व विषयांवर भाष्य करण्यात आले. पाकिस्तानने पुन्हा काश्मीरच्या मुद्दावर आपले भाष्य केले आहे. तर त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणेत पुन्हा काश्मीरच्या मुद्द्यावर बोलत, लष्करावरही खोटे आरोप केले. भारतीय लष्करच काश्मीरमध्ये भीती निर्माण करण्याचं काम करत आहे. तसेच लष्कर पाकिस्तानात मानवताविरोधी गुन्हे करत असल्याचंही खोटे भाष्य त्यांनी त्यावेळी केलं.