मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच खातेवाटप होईल असे सांगितले जात होते. मात्र, 14 दिवस झाले तरी खातेवाटप होत नसल्याने मंत्र्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये नाराजी होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केले.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कामाचा धडाका सुरु केला. आधीच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. आता खातेवाटपात देखील मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय मोडीत काढला आहे.
ठाकरे सरकारच्या खातेवाटपामध्ये महत्त्वाचे असलेले गृह खाते हे सेनेने आपल्याकडे ठेवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे खाते स्वत:कडे ठेवले होते. पाच वर्ष हे खातं त्यांच्याकडे होते. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा राज्याचा गृहमंत्री हा वेगळा असावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, फडणवीस यांनी हे खाते दुसऱ्या कोणालाही न देता स्वत:कडे ठेवले होते.
राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. सरकारमध्ये गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले नाही. त्यामुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री मिळाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही गृहमंत्रीपद स्वतंत्र ठेवण्यात आले होते. आर.आर. पाटील यांनी राज्याचे गृहमंत्रीपद भूषवलं होतं. आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजपचे सरकार आले. त्यावेळी हे पद देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून या सरकारमध्ये गृहमंत्रीपद स्वतंत्र ठेवण्यात आले आहे.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- आरोग्यासाठी ‘ग्रीन टी’ चांगली, परंतु, ‘या’ ५ गोष्टींची काळजी आवश्यक घ्या
- झोपताना कधीही जवळ ठेवू नका ‘स्मार्टफोन’! हे आहेत ६ गंभीर दुष्परिणाम
- रात्री लवकर झोप येत नसेल तर ‘हे’ ९ उपाय आवश्य करा
- खरबूज खाण्याचे ‘हे’ आहेत 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- मानसिक तणाव कमी करण्यासाठी करा ‘हे’ ४ उपाय, मिळेल आराम
- दिवसभर ‘सॉक्स’ वापरल्याने होऊ शकतात ‘या’ ३ समस्या, अशी घ्या काळजी
- कलिंगड खा…आणि ‘या’ ५ आरोग्य समस्यांना दूर पळवा, जाणून घ्या