देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – “हे ‘पलटूराज’ सरकार, बदल्या करा अन् माल कमवा हेच त्यांचे धोरण”

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे रोज नवी घोषणा करीत आहे आणि मागे घेत आहे. हे सरकार म्हणजे पलटूराज सरकार (thackeray-government-palturaj-government) आहे. तसेच वर्षभर बदल्या करा आणि माल कमवा, हे धोरण या सरकारने अवलंबले आहे. सगळीकडे बदल्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाल्याची टीका भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

चिंचवड येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 25) मेळावा घेण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, निरंजन डावखरे, महापौर उषा ढोरे, महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, 2002 चा अपवाद सोडला, तर पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड होता. तो आपल्याला राखायचा आहे. कोविडचे आव्हान देशासमोर उभे राहिले असताना, राजकीय पक्ष पंतप्रधान मोदी यांना नावे ठेवताे. मात्र, पंतप्रधानांना सामान्य माणसांची चिंता आहे. राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही. समृद्ध राज्याने तुम्ही तुमच्या, आम्ही आमच्या घरी सुखरूप राहा, एवढेच सांगितले. ही दुर्दैवी बाब आहे. मदत करायची सोडून न वापरलेल्या विजेचे भरमसाठ बिल दिले. दोन खोल्यांसाठी 20 हजार बिल आले होते. वीज वापरलीच नाही तर बिल का भरावे. जी बिले वाढीव आहेत. त्याला आमचा विरोध असल्याचे फडणवीस म्हणाले.