कलाक्षेत्रामुळेच संभाजी महाराजांची भूमिका पार पाडू शकलो : कोल्हे 

पिंपरी  : पोलिसनामा ऑनलाईन

संभाजी महाराजांची भूमिका साकारायची हे महाविद्यालयापासूनचे स्वप्न होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत हे स्वप्न पूर्णत्वाला आले आहे. महाराजांच्या नखाचीही किंमत नसताना फक्त कलाक्षेत्रामुळेच त्यांची भूमिका पार पाडू शकलो असे प्रतिपादन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’540b2e51-c4ba-11e8-b98b-a508136ff6bd’]

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. मात्र निधड्या छातीच्या संभाजी महाराजांना त्यांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला की काय असा प्रश्न मनात येतो.अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आहेर गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीच्या माध्यमातून शिवाजी महाराज फेम शंतनु मोघे, संभाजी महाराज फेम डॉ.अमोल कोल्हे, झी वाहिनीच्या वरिष्ठ कार्यकारी निर्मात्या सोजल सावंत, मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांच्याशी मुक्त संवाद साधला.
याप्रसंगी राज्यसभेचे खासदार अमर साबळे, उपमहापौर सचिन चिंचवडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक शाम लांडे, समीर मासुळकर, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, करुणा चिंचवडे, विक्रांत लांडे, अमित गावडे, मोरेश्वर शेंडगे,राजु बनसोडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, महिला काँग्रेसच्या शहराध्यशा गिरिजा कुदळे, दिशाचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजु गोलांडे, राजु दुर्गे, जितेंद्र ननावरे, दत्ता पवळे, धनंजय काळभोर, उर्मिला काळभोर, बाळासाहेब मोरे, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अण्णासाहेब मगर बँक संस्थापक बाळासाहेब गव्हाणे, इंद्रायणी बँकेचे अध्यक्ष  एस. बी. चांडक आदि मान्यवर उपस्थित होते.

[amazon_link asins=’B00MIFIYVM,B00DQQN51Q,B00BON6XX0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’77afc83a-c4ba-11e8-9cd4-9f331ccc6838′]

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत संवाद साधताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न मी पाहिले. त्याची दोन कारणे आहेत. प्रथमतः महाविद्यालयात असताना विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी माझ्या वाचनात आली, त्यामुळे मी भारावून गेलो. आणि दुसरे म्हणजे, डॉ काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकतील संभाजी महाराजांची भूमिका. ते पाहून संभाजी महाराज अधिकच जवळचे वाटू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वानाच माहिती आहे. मात्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला असा प्रश्न कायम मनात भेडसावत होता.

सकल मराठी समाजाच्या वतीने समतावादी राज्याभिषेक दिन साजरा

सुरुवातीला नितीन देसाई यांच्या माध्यमातून राजा शिवछत्रपती मालिकेत शिवाजी महाराज यांची भूमिका साकारायला मिळाली. शंभूराजे नाटकातून संभाजी साकारत होतोच. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज या दोन्ही व्यक्तीरेखा वेगवेगळ्या आहेत. छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारायची ही खुणगाठ मनाशी पक्की होतीच.

खरं तर ही मालिका उभी राहताना अनेक अडचणी आल्या परंतु मी त्याचे भांडवल करु इच्छित नाही. रसिकांच्या व झी मराठीच्या पाठिंब्यामुळे त्यातून मार्ग काढू शकलो. मालिकेतील सध्या सुरू असलेल्या कथानकाचा संदर्भ देत अमोल कोल्हे म्हणाले, आता कुठे वारा वाहू लागला आहे. छप्पर उचकटून टाकणारे वादळ येण्याचा टप्पा अजुन पुढे यायचा आहे. या विषयासाठी वाहून घेतले आहे.
ज्या लढवय्या राजाच्या बलिदानानंतरही अठरा महिने रयतेने लढा दिला तो राजा असामान्यच होता. आज या मालिकेच्या माध्यमातून संभाजी राजांचा खरा इतिहास आम्ही मांडत आहोत. जगभरात सोळा कोटी लोक ही मालिका पाहत आहेत. प्रेक्षकांनी अक्षरशः ही मालिका डोक्यावर घेतली आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01DF29XFW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’66e05bfc-c4be-11e8-92ff-7fc90ec650da’]

सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्यावर अनेक मतप्रवाह व्यक्त होत असतात. सर्वांना आपलेसे वाटेल, पटेल आणि रुचेल अशा पध्दतीने आम्ही उपलब्ध पुराव्याच्या आधारे मालिकेची मांडणी केली आहे.

झी वाहिनीने दाखविलेले धाडस, कलाकारांनी साकारलेल्या भूमिका, मालिकेच्या संपूर्ण टीमने घेतलेले कष्ट आणि प्रेक्षकांनी दिललेला प्रतिसाद यामुळेच आम्ही संभाजी महाराज जांचा जाज्वल्य आणि खरा इतिहास सर्वापर्यत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय.
कार्यक्रमाची सुरुवात युवाशाहीर हेरंब पायगुडे यांच्या पोवाडा गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. आभार डॉ. शाम अहिरराव यांनी मानले.

सेरेना विल्यम्सने टॉपलेस होवून गायलं गाणं

जाहिरात.