आठवड्यातून एकदा पाकिस्तानला जाणारी ‘थार लिंक एक्सप्रेस’ भारताकडून रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकस्ताननं तात्काळ भारताशी व्यापारी संबंध तोडले, समझोता एक्सप्रेस बंद केली. आता भारताने देखील जोधपूर ते मुनाबाव या दरम्यान आठवड्यातून एकदा पाकिस्तानला जाणारी थार लिंक एक्सप्रेस रद्द केली आहे.
Indian Railways: Thar Express train(Jodhpur to Karachi) stands cancelled till further orders pic.twitter.com/ZFeKwVaFqF
— ANI (@ANI) August 16, 2019
थार लिंक एक्सप्रेस ही भारत-पाकिस्तान या दोन देशात १८ फेब्रुवारी २००६ पासून सुरू होती. जोधपूरच्या भगतच्या कोठीहून कराची दरम्यान सुरू असलेली ही रेल्वे सेवा रेल्वे मंत्रालयाने रद्द केल्याची घोषणा आज केली आहे. थार लिंक एक्सप्रेसला जोधपूर ते कराची शहराला जोडणारी रेल्वे म्हणून पाहिले जात होते. थार लिंक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या बाबतची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली असून पुढील आदेश येईपर्यंत ही रेल्वे सुरू करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- शरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे
- ‘हे’ 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या
- घरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स ; जाणून घ्या
- ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या
- सातत्याने ‘LED’च्या संपर्कात राहिल्यामुळे होणारे तोटे ; जाणून घ्या
- ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण
- वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘या’ पद्धतीने मेटॅबॉलिझम रेट वाढवा
- जाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार
- तुम्ही तोंडासंबंधी ‘या’ चुका करता का ? होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध !