…म्हणून माझे ‘लग्न’ होत नाही : सलमान खान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन- बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाबद्दल नेहमीच चर्चा सुरू असते. सलमानला नेहमी त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. तो नेहमी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मोठ्या हुशारीने टाळत असतो. पण या वेळी त्याने या प्रश्नाचे थेट उत्तर दिले. ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सलमानने सांगितले की आजपर्यंत त्याला कोणीही लग्नासाठी प्रपोज केले नाही. त्यामुळे त्याचे लग्न होत नाही. आत्ताच काही दिवसांपूर्वी भारत चित्रपटाची एक क्लिप सोशल मीडियावर आली त्यात कॅटरिना कैफ सलमान खानला प्रपोज करते आहे. या क्लिपबद्दलच्या एका प्रश्नावर सलमान खान म्हणाला की आजपर्यंत कुठल्याही मुलीने त्याला प्रपोज केले नाही.

यानंतर सलमान खानने सांगितले की, मी कॅण्डल लाईट डिनर करत नाही आणि जर मी कॅण्डल लाईट डिनर केले असते तर मला प्रपोज आले असते. भारत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानला प्रश्न विचारला की तुला तुझ लग्न होत नाही त्याबद्दल दुःख वाटत नाही का? त्यावर सलमानने सांगितले की, ‘ हो मला दुःख होते की आजपर्यंत मला कोणी लग्नासाठी प्रपोज केले नाही.’

सलमान खानचा आगामी चित्रपट भारत येत आहे त्यात सलमान सोबत कॅटरिना कैफ काम करताना दिसून येईल. या चित्रपटानंतर सलमान संजयलीला भंसाली सोबत ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात काम करणार आहे. तब्बल १९ वर्षानंतर सलमान संजयलीला भंसाली सोबत काम करणार आहे. संजय सोबत काम करण्याबाबत सलमानने सांगितले की, “मी खूप उत्साही आहे आणि इंशाअल्लाह चित्रपट शूट करतांना खूप मज्जा येणार आहे आणि भांडण सुद्धा होणार आहे, कारण माझ आणि संजयचा नातंच असं आहे.”