नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्या प्रत्येक सभेत टुकडे टुकडे की गैंग म्हणून विरोधकांचा उल्लेख करतात. या गैंगने देशभरात अशांती पसरविली असल्याचा आरोप करतात. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाला देशात अशी कोणती गैंग असल्याची काहीही माहिती नाही.
पत्रकार साकेत गोखले यांनी माहिती अधिकार कायद्याखाली देशात टुकडे टुकडेची गैंग कोणती, तिच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे. अशी विचारणा केली होती. त्यावर शेवटी गृहमंत्रालयाने उत्तर दिले आहे.
त्यात गृह मंत्रालयाकडे टुकडे टुकडे गैंगची काहीही माहिती नाही. जर या उत्तराने तुमचे समाधान झाले नाही तर, तुम्ही सह सचिव प्रकाश यांच्याकडे अर्ज करु शकता असे उत्तर गृह मंत्रालयाच्या वतीने दिले आहे.
याबाबत साकेत गोखले यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाकडे टुकडे टुकडे गैंगबाबत काहीही माहिती नाही. ही गैंग अधिकृतपणे अस्तित्वात नाही. ती गृहमंत्री अमित शहा यांची कल्पनाशक्ती आहे. त्यांनी पुढच्या वेळी कुत्र्याच्या शेपटीची उपमा द्यावी, असे म्हटले आहे.
दिल्लीतील एका वृत्तपत्रातील पत्रकार साकेत गोखले यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागविली होती. त्यात टुकडे टुकडे ची गँग कोणती आहे. ही गँग देशात दंगे घडवून आणत असेल तर त्यांच्यावर अनलॉफुल एक्टिव्हिटी प्रिव्हेंशन अक्ट (युएपीए) अन्वये का कारवाई केली गेली आहे. या गँगवर प्रतिबंधीत केले का, जर कारवाई केली गेली नसेल तर का केली गेली नाही, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. पत्रकार गोखले यांनी २६ डिसेंबर रोजी ही आरटीआय दाखल केली होती. तिला आता गृहमंत्रालयाने उत्तर दिले आहे.
‘टुकडे टुकडे गैंग’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम २०१६ मध्ये जेएनयु कँपसमध्ये देशविरोधी घोषणाबाजी झाल्यानंतर वापरण्यात आला होता. जेएनयु च्या विद्याथ्यार्ना पाठिंबा देणाऱ्या पक्षांसाठी वापरण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीदरम्यान एकत्र येणाऱ्या विरोधी पक्षांची खिल्ली उडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टुकडे टुकडे की गैंग असा उल्लेख करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेएनयु व सीएए विरोधात देशभर सुरु झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांना उद्देशून बोलताना टुकडे टुकडे गैंग देशाभरात दंगली घडवत आहेत. देशात सुरु असलेल्या या आंदोलनाला त्यांची फुस असल्याचा आरोप केला आहे.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !