…म्हणून मोबाईल चोरट्याला लोकांनी दिले सोडून !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनच्या काळात हातावर काम असलेल्या मजुरांचे अतोनात हाल झाले आहेत. मागील 3 महिन्यांपासून काम नसल्यामुळे अनेकजण आता गुन्हेगारीकडे वळले आहे. अशीच एक घटना दिवा येथे घडली अहे. चाळीतून मोबाईल चोरणार्‍या तरुणाला नागरिकांनी पकडल्यावर त्याला पोलिसांकडे न देता सोडून दिले आहे.

ठाण्याच्या लगत असलेल्या दिवा येथील साबे गावातील डी जी कॉम्पलेक्स इथे एका चोराला नागरिकांनी मोबाइल चोरताना पकडले होते. नागरिकांनी या तरुणाला चोप दिला आणि बांधून ठेवले. चोप दिल्यानंतर सुटकेसाठी या तरुणाने गयावया केली. ’कामाच्या शोधात गावावरुन आलो होतो पण आता हाताला काम नसल्याने चोरी करू लागलो.

त्यात गेली 3 महिने अक्षरश: उपासमारीची वेळ आली म्हणून मोबाईल चोरला’ अशी व्यथाच तरुणाने मांडली. आमच्या टोळीने आतापर्यंत या भागात खूप चोर्‍या केल्या आहेत, अशीही कबुली त्याने दिली. लॉकडाउनमुळे चोरी केल्याचे ऐकून नागरिकांनी या चोराला सोडून दिले.