200 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढलं गायीचं ‘वासरू’, 3 तासाच्या नाट्यानंतर बछड्याला उतरवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गौरक्षा आणि गौसंरक्षणासंबंधित सरकारद्वारे अनेक दावे करण्यात येत आहेत. परंतू सरकारच्या या दाव्याला हरताळ फासला गेल्याचे ताजे उदाहरण रेवाडी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत घडले.  वसाहतीत एकच खळबळ उडाली जेव्हा एक गाईचे वासरु 200 फूटाच्या पाण्याचा टाकीवर चढले होते, परंतू प्रशासनाचा कोणत्याही अधिकाऱ्याला वाटले नाही की त्या वासराला तेथून खाली उतरवावे.
the calf
खेडा मुरार रोड स्थित पार्कमध्ये पाण्याची टाकी आहे. ज्यावर काल रात्री एक वासरु चढले. सकाळी जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली.
Calf
प्रशासनाने यानंतर आग्निशमनची गाडी घटनास्थळी पाठवली, परंतू कर्मचाऱ्यांकडे आवश्यक उपकरणे नव्हती. त्यानंतर ही माहिती गौरक्षा दलाच्या सदस्यापर्यंत पोहचले आणि त्यांनी देखील प्रशासकीय आधिकाऱ्यांना या संबंधित सुनावले. परंतू प्रशासनाने त्यांचे देखील ऐकले नाही तेव्हा रेस्क्यू ऑपरेशन राबवत क्रेनच्या माध्यमातून वासराला सुरक्षित उतरवले.

Visit : Policenama.com