मुख्यमंत्री हे आत्ताच्या काळातील ‘अनाजी पंत’

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या घरात फूट पाडणारा अनाजी पंत होता आणि आता दोन छत्रपतींच्या घरात फुट कुणी पाडली तर फडणवीस यांनी, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. पाथरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. तसेच आत्ताही मी चालू मुख्यमंत्री आहे आणि पुढेही मीच चालू मुख्यमंत्री रहाणार हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर लगेच कर्जमाफी करतो असे आश्वासन दिले हेत. मात्र, ही फसवी योजना निघाली असून शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. फसवी कर्जमाफी जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

अमोल कोल्हेंनी सांगितला मुख्यमंत्र्यांच्या ‘MBA’ चा अर्थ
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले, आपले मुख्यमंत्री एमबीए आहेत. त्यांच्या पदवीचा आदर करून सांगतो आज ती पदवी म्हणजे ‘महाबोलबच्चन’ यात्रा झाली आहे. सरकारने प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका देखील त्यांनी पाथरीच्या जाहीर सभेत केली.

आरोग्यविषयक वृत्त –