26/11 च्या मुंबई हल्ल्यातील ‘हा’ हिरो लढवणार NCP च्या तिकीटावर दिल्लीची ‘निवडणूक’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील हिरो माजी एनएसजी कमांडो आणि आपचे आमदार सुरेंदर सिंह हे पुन्हा एकदा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, यावेळी ते आपच्या तिकीटावर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: याची माहिती दिली आहे.
मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी दोन हात करणारे एनएसजी कमांडो सुरेंदर सिंह यांनी 2013 मध्ये आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत कँन्टोमेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर सलग तीनवेळा निवडून आलेले करन सिंह तन्वर यांचा पराभव केला होता.
Former Aam Aadmi Party leader and Former NSG Commando Surender Singh: I am fighting elections on NCP ticket. I got offer to fight elections from all parties but I chose NCP. I will reveal more information tomorrow. #DelhiElections2020 pic.twitter.com/2NU7HbzmOj
— ANI (@ANI) January 21, 2020
सुरेंदर सिंह यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. आपल्याला अनेक पक्षांकडून यासाठी ऑफर होती मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी याबाबत माहिती देईन असेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपने पुन्हा तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या सुरेंदर सिंह यांनी मंगळवारी ट्विटद्वारे आपण आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. आपल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी लिहले आहे की, आज मी खूप दु:खी आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे.
आज मैं दुखी होकर आम आदमी पार्टी से त्यागपत्र दे रहा हूँ @ArvindKejriwal @AAPDelhi @News18India @ANI pic.twitter.com/cZZ6igeVFJ
— Commando Surender Singh MLA (@AAPkaSurender) January 21, 2020
मुंबई हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी लढताना ते गंभीर जखमी झाले होते. यामध्ये त्यांना अपंगत्व आले होते. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना भारतीय लष्कराच्या सेवेतून निवृत्ती घ्यावी लागली होती. त्यानंतर 19 महिने त्यांना पेन्शन मिळाली नाही. यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे उंबरठे झिजवले. दरम्यान, ते आपचे नेते आरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले. काही काळानंतर त्यांना पेन्शन सुरु झाली. सुरेंदर सिंह यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यांना केजरीवाल यांनी आपची उमेदवारी दिली. यामध्ये ते विजयी झाले होते.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !