भारतामध्ये बालमृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतात दर दोन मिनिटांनी सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू होतो. पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभावामुळे हे मृत्यू ओढवतात. जगभरात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे, असा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रातील आंतरसंस्थांच्या गटाने (यूएनआयजीएमई) दिला आहे. यूएनआयजीएमई ही संस्था बालमृत्यू दरासंबंधात काम करते.

[amazon_link asins=’B00XVN9WY8,B00YGLFY9Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea32be85-bbbc-11e8-9eb9-b917c4f096eb’]

भारत ८,०२,०००, नायजेरिया ४,६६,०००, चीन ३,३०,०००, पाकिस्तान ३,३०,०००, काँगो २,३३,००० असे देशनिहाय बालमृत्यूचे प्रमाण आहे. यासंदर्भात यूएनआयजीएमईच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतात गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भकांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांमधील हा नीचांकी दर आहे. तरीही ही संख्या जगाच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाची आहे. चीनमध्येही अर्भकमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी सुमारे तीन लाख तीस हजार अर्भकांचे मृत्यू झाले. भारतात गेल्या वर्षी नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण सहा लाख पाच हजार नोंदविण्यात आले. पाच ते १४ या वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण एक लाख ५२ हजार आहे. गेल्या वर्षी १५ वर्षांखालील सहा लाख ३० हजार मुले मृत्युमुखी पडली. याचाच अर्थ प्रत्येक पाच सेकंदाला एक मुलगा मृत्यू पावला. पाच वर्षांकालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण खूप खाली आले आहे.

शिक्षणमंत्री विनादे तावडे यांना न्यायालयाची अवमान नोटीस

जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य प्रमुख डॉ. गगन गुप्ता यांनी म्हटले की, भारतात दर वर्षी दोन कोटी ५० लाख अर्भके जन्माला येतात. या तुलनेत गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूदर खाली आला आहे. जगात जन्माला येणाऱ्या मुलांपैकी १८ टक्के मुले भारतात जन्म घेतात. पाच वर्षांखालील अर्भकांच्या मृ्त्यूचे प्रमाण हे गेल्या वर्षी प्रथमच जननदराच्या प्रमाणात आले आहे. आता पुढील पाऊल म्हणजे मृत्यूचे प्रमाण रोखणे होय. अर्भकमृत्यूचे दर कमी करण्याच्या दृष्टीने भारत प्रगतीपथावर असून, त्या दृष्टीने भारत सरकारकडून अनेक मोहिमा आखल्या जात आहेत, असे गुप्ता म्हणाले.

‘त्या’ प्रियकरला मारण्यासाठी दिली १ कोटीची सुपारी

युनिसेफच्या प्रतिनिधी यास्मिन अली हक यांनी याबाबत माहिती दिली आहे की, नवजात अर्भकांसाठी देशभरात विशेष देखभाल केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सातत्याने लसीकरणाच्या मोहिमा राबविण्यात येत आहेत. या प्रयत्नांमुळे २०१६ च्या (आठ लाख ६७ हजार) २०१७मध्ये (आठ लाख दोन हजार) बालमृत्यूचे प्रमाण खाली आले आहे. मुलींच्या मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे.