दुर्दैवी ! एकाच कुटुंबातील 6 जणांवर काळाचा घाला; अपघाताच्या काही वेळापूर्वीच साजरा केला होता ‘बर्थडे’

भोपाळ : राजस्थानच्या टोंक येथे एक भीषण अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या ट्रेलरची जीपला जोरदार धडक बसली. यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यातील 6 जण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्वजण मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

राजगडमध्ये जीरापूर येथील चुलत भाऊ ललित पिता श्याम सोनी आणि पवन पिता सुंदरलाल सोनी एक जानेवारीला खाटू श्याम मंदिराच्या पदयात्रेसाठी जात होते. हे दोघेही जवळपास 25 दिवस चालत खाटू श्याम मंदिरात पोहोचले होते. तेथे पोहोचल्यानंतर कुटुंबातील काही सदस्य, दोन चुलत भावांना घेऊन दोन चारचाकी वाहनांनी राजस्थानात पोहोचले होते. 26 जानेवारीला दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंब दोन वाहनांमधून परतत होते. त्याचदरम्यान पुढे जात असलेल्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरुष, 2 महिला आणि 3 बालकांचा समावेश आहे. तर काही लोक गंभीररित्या जखमी झाले.

दरम्यान, श्याम खाटू मंदिराच्या दर्शन घेतल्यानंतर परतत असताना या वाहनातील रामबाबू सोनी यांचा अपघाताच्या काही तासांपूर्वीच वाढदिवस साजरा केला होता.