‘ऋषी-नीतू’ची लव्ह स्टोरी, दुराव्यानं आणलं जवळ, पॅरिसवरून केला होता ‘टेलीग्राम’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं आज (दि 30 एप्रिल) निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सिनेमा जगताला मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूरला प्रत्येक काळात चाहत्यांची पसंती मिळाली आहे. त्यांना कॅन्सर होता. अमेरिकेत त्यांनी उपचार घेतले ज्यानंतर ते गेल्या वर्षी मुंबईत परतले होते. या कठिण काळात सावली प्रमाणे त्यांच्या सोबत राहिली ती म्हणजे त्यांची पत्नी नीतू कपूर.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर मोस्ट आयकॉनिक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कपल्सपैकी एक होते. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही त्यांची केमिस्ट्री कमालीची होती. आज आपण हे जाणून घेणार आहोत की, नेहमीच नीतूचं कौतुक करणाऱ्या ऋषी कपूर यांना नीतूवरील प्रेमाची जाणीव कशी झाली.

ऋषी कपूर आणि नीतू यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. खूप वेळ सोबत घालवला आहे. परंत दोघंही कधीच अॅक्ट्रॅक्ट झाले नाहीत.

ऋषी कपूर यांना प्रेमाची जाणीव तेव्हा झाली जेव्हा बारूद या सिनेमासाठी ते काही दिवस तिच्यापासून दूर गेले.

ऋषी कपूर शुटींगसाठी पॅरीसला गेले होते. तिथं त्यांना खूप एकटं वाटत होतं. 2-3 दिवसांतच त्यांना याची जाणीव झाली की, त्यांचं नीतूवर प्रेम आहे.

पॅरीसवरून त्यांनी नीतूला टेलीग्राम केलं होतं. यात ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं की, “ये सिखणी बडी याद आती है.”

हे वाचल्यानंतर मात्र नीतू कपूर यांना त्यांचा आनंद गगनात मावेना झाला होता. तिलाही आपली खुशी लपवता आली नाही. तिनं तो टेलिग्राम यश आणि पामेल चोपडा यांना दाखवला होता.