मुंबईतील कीर्ती व्यासच्या हत्येचा छडा लागला

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

मुंबईतील बेपत्ता तरुणी किर्ती व्यासची हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. किर्तीच्या हत्येप्रकरणी तिच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मेमो दिल्याच्या रागातून दोघांनी किर्तीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

28 वर्षीय कीर्ती व्यास बीब्लंट सॅलॉनच्या अंधेरी पश्चिम भागातील शाखेत फायनान्स मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. ती मागील दीड महिन्यांपासून बेपत्ता होती. त्यामुळे नेमके किर्ती व्यासचं झालं काय हा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्राॅंचने तीच्या दोन सहकाऱ्यांना चाैकशीसाठी ताब्यत घेतले होते तेव्हा या दोघांनी तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपींच्या गाडीत रक्ताचे सुकलेले डागही आढळले आहेत.अद्याप किर्तीचा मृतदेह सापडला नसला तरी, किर्तीच्या पालकांची डीएनए चाचणी केल्यानंतर ते रक्त किर्तीचे असल्याचे समोर आले आहे.

काय होते प्रकरण

किर्ती फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत होती. तिच्याच आॅफिसमध्ये हे आरोपी काम करत होते. सतत ढिसाळ काम केल्याबद्दल आरोपीला किर्तीने मेमो दिला होता. या रागातून सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांनी किर्तीचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.