महाड (रायगड) : पोलीसनामा ऑनलाईन
रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवणातून जवळपास १२० जणांना विषबाधा झाली होती तर पाच जणांचा यात मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणाचा छडा लागला असून एका महिलेने जाणूनबुजून तिच्या रंगावरून,तिला स्वयंपाक न येण्याच्या कारणावरून तसेच तिचे लग्न मोडल्याच्या कारणावरून हिणवल्यामुळे तिने चक्क जेवणात कीटकनाशक मिसळल्याची कबुली दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महाड येथील सुभाष माने यांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमप्रसंगी जवळपास १२० गावकरी आणि नातेवाईक उपस्थित होते. वास्तुशांतीच्या जेवणात विषबाधा झाल्याने एकाच खळबळ माजली होती . या घटनेत ५ जणांचा बळी गेला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, या प्रसंगाचा पोलीस तपास करीत होते. या तपासादरम्यान जेवणात कीटकनाशक वापरल्याचे समोर आल्यामुळे पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला . यामध्ये सुभाष नाईक यांची नातेवाईक प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हि महिला तब्बल दोन तीन दिवस रुगणालयात उपचारासाठी गेली होती त्यामुळे तिच्यावर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी आरोपीची चौकशी करण्यास सुरवात केली. चौकशीअंती हा सर्व प्रकार कौटुंबिक वादातून झाला असल्याचे समोर आले.खुद्द प्रज्ञा ने कार्यक्रमाच्या दिवशी जेवणातील वरणामध्ये किटकनाशक टाकल्याने विषबाधा झाल्याची कबुली दिली. तिला वारंवार तिच्या रंगावरून तिला स्वयंपाक न येण्यावरून हिनवले जात होते. त्याचाच राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचे सांगितले. तिच्या या रागामुळे पाच जणांना मात्र आपला जीव गमवावा लागला.