सरदार पटेल यांचा पुतळा २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

अहमदाबाद : वृत्तसंस्था

सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे गुजरात सरकारने म्हटले आहे. सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन करण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केली आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात हा पुतळा उभारण्यात येत आहे.

पुतळा उभारण्यात येत असलेल्या या परिसराला एकता की प्रतिमा असे नाव देण्यात आले असून मुख्यमंत्री विजय रूपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी हा पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेतला.

[amazon_link asins=’B0785JJF7L,B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5c3a426c-a906-11e8-898f-9d46062e4025′]

सरदार सरोवर धरणापासून एक किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवरील एक लहान साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे. अंतर्गत स्टील व ब्राँझचे काम १० सप्टेंबर आणि २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. तर, पूर्ण पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. पुतळा उभारणीसाठी १९८९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी देशाला एकसंध ठेवण्याचे अवघड काम केले. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून या महान नेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेसने नेहमीच सरदार पटेल यांचा वारसा दुर्लक्षीत केला आहे, असेही रूपानी म्हणाले.