…अमिता चव्हाण यांना जालन्यातून उमेदवारी द्या

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडमधून लोकसभा लढवणार आहेत, अशी चर्चा आहे. असे झाले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी जालना लोकसभा लढवावी; अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. राहुल गांधींसोबत बैठकीत ही मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जालन्यातली आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधी हे मराठवाड्यातुन लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहणार असतील तर ते नांदेड येथून उभा राहतील असा अंदाज आहे. मुबंई येथे २६ जानेवारी रोजी बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अमिता चव्हाण यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची मागणी असणार आहे, असे माजी आमदार गोरंट्याल म्हणाले.

दरम्यान, जालनामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेते नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे आहेत, तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही दानवेंच्या विरोधात आधीच दंड थोपटले आहेत. मात्र आता जालन्यातून अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. सध्या अमिता चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.