…तर राजस्थानमधील शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल 

जयपूर : वृत्तसंस्था – लव जिहाद प्रकरण नाही थांबवलं तर देशातील प्रत्येक शहर पाकिस्तान बनेल असे वादग्रस्त विधान उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्या नंतर कटारिया यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले जात आहे.

उदयपूर येथील वल्लभ नगर ब्लॉकमधील एका गावामध्ये नवीन वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना लव जिहाद प्रकरण नाही थांबवले तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. इजेच नव्हे तर संधी मिळाल्यास जुन्या जयपूरला भेट द्या. या परिसरातील मंदिरांमध्ये असणाऱ्या मूर्तींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत, कारण येथील मंदिरातील मूर्तींची सेवा होत नाही. कोणत्याही धार्मिक रीतिरिवाजांचे येथे पालन होऊ शकत नाही, कारण येथील लोक मंदिर परिसरात मांस-हाडे फेकतात. या लोकांसोबत प्रत्येक दिवशी कोण वाद घालत बसेल ?’ असे वक्तव्य उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी केले.

इतकेच नव्हे तर ”आता लोकांना कुटुंब आणि तरुण मुलींचा बचाव करण्यासाठी घर सोडून जाव लागत आहे. तुम्हाला माहितीय लव्ह जिहाद काय आहे? असा प्रश त्यांनी विचारला. इतकेच नव्हे तर, तुमच्या मुली पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही चुका करत असाल तर यातून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. यावर तुम्ही केवळ रडू शकता. धोका लक्षात घेऊन हिदूंनी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी एकत्र यायला हवे. आपण सर्व रामाचे पुत्र आहोत, जाती आणि धर्म विसरुन जा. रामच आपला धर्म आणि जात आहे. आपण जेव्हा मरतो, तेव्हाही ‘राम-राम’ म्हणतो. एकमेकांना भेटतो तेव्हाही ‘राम-राम’ याच शब्दाचा उपयोग करतो”. असेही ते म्हंटले.

विशेष म्हणजे त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटले अशी शक्यता वर्तविली जात आहे.