… तर त्यांना अटक करावं अन् 10 वर्षांसाठी अंदमानात पाठवावं : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कलम 370 रद्द करण्याचा निर्णय चीन कधीही मान्य करणार नाही. चीनच्या मदतीने जम्मू – काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल, अशी अपेक्षा फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली होती. तसेच, मेहबुबा मुफ्ती यांनी देखील नजरकैदेतून सुटका झाल्यावर कलम 370 हटवण्याबाबत वक्तव्य केलेल आहे. यावरून सेना नेते खासदार संजय राऊत (sanjay-raut) यांनी या दोघांवर निशाणा साधला आहे.

फारुक अब्दुल्ला असो की मेहबुबा मुफ्ती, जर कुणी भारतीय राज्यघटनेला आव्हान देण्यासाठी चीनची मदत घेण्याची भाषा करत असतील, तर त्यांना (then-they-should-be-arrested-sent-to-andaman-for-10-years) अटक करून दहा वर्षांसाठी अंदमानात पाठवावे. ते मुक्तपणे कसे काय फिरू शकतात, असे राऊत यांनी म्हटले आहे.

या अगोदर, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानावरून राऊत यांनी मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला होता. जर मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि अन्य लोक चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम 370 लागू करू इच्छित आहेत. तर, केंद्र सरकारने कडक पावले उचलावीत. कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखल जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे राऊत यांनी म्हटल होत.

14 महिने स्थानबद्धतेत राहिल्यानंतर बाहेर पडलेल्या पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असे म्हटल होते. जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही, मुफ्ती म्हणाल्या होत्या.