…तर सिक्किम पेटवू, वाढत्या कोरोनाची चिंता करा; तैवानच्या मुद्यावरून चीनची भारताला धमकी

बिजिंग : वृत्तसंस्था – चिनी सरकारच्या एका वृपत्रामधून भारताला उघड धमकी देण्यात आली आहे. तर भारत देशात होत असलेल्या तैवान संदर्भात चर्चा ह्या चिनी सरकारला खपत नसल्याने संतापलेल्या चीनने थेट भारताला धमकी दिली आहे. चीनने असे म्हणले आहे की, भारताने तैवानला समर्थन दिल्यास भारताल नुकसान पोहोचविण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय असल्याचे चीनने म्हटले आहे.

या मुद्यावरून चिनी सरकारने म्हटले आहे की, आम्ही सिक्किमला भारताचे राज्य नाही असे मानू शकतो. जर भारत चीनमधील विद्रोहींच्या कृत्याचे समर्थन करत असेल तर चीन डोळ्यांच्या बदल्यात डोळा या उक्तीप्रमाणे पूर्वोत्तरेतील भारतद्रोही शक्तींना, फुटीरतावाद्यांना चीन समर्थन देईल. तसेच, भारताने तैवानची नाही तर विक्राळ होत चाललेल्या कोरोना महामारीची चिंता करावी. भारतात जेव्हा अंतर्गत संकटे उद्भवतात तेव्हा तो चीनचे नाव घ्यायला आणि तणाव वाढवायला सुरुवात करतो. कारण लोकांचा लक्ष त्यावरून दुसरीकडे नेता येईल. भारत एक उच्च क्षमतेचा विकासशील देश व्हायला हवा. कोरोना महामारीमध्ये भारत इतर जगापेक्षा अधिक लस तयार करत आहे. मात्र, दुर्दैवाने तो दुसऱ्यांच्या विषयात पडून स्वत:चे नुकसान करत आहे, असे चीनने ग्लोबल टाईम्समधून म्हटले आहे.

चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये बंडखोरांना समर्थन देऊ शकतो. असे आंतरराष्ट्रीय अभ्यास करीता शांघाय संस्था चीन-दक्षिण आशिया सहकारिता संशोधन केंद्राचे सचिव जनरल लियू जॉन्गयी यांच्या हवाल्याने असा दावा करत म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारानुसार एकमेकांच्या क्षेत्रिय अखंडतेचा सन्मान करणे लिहिलेले आहे. तैवानला वेगळा देश समजणे हे या करारचे उल्लंघन आहे. अशात नवी दिल्लीला बिजिंगबाबत कोणतेही वक्तव्य करणे टाळायला हवे. असे ग्लोबल टाईम्सनुसार म्हटले गेले आहे.