हा ‘शपथविधीला’ ही सकाळीच येतो, सकाळी 7 वाजता भाषणाला आलेल्या अजित पवारांची ‘टोलेबाजी’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या कामाचा धडाका लावला. अजित पवार यांच्या सकाळी लवकर काम करण्याच्या शैलीमुळे शासकीय अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ होते. अजित पवार सध्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज पहाटे सहा वाजताच कामाला सुरुवात केली. अजित पवार यांनी पुन्हा एकदा वेळेच्या आत कार्यक्रमाला हजेरी लावल्याने प्रशासनाबरोबरच आयोजकांची देखील धावपळ उडाली.

अजित पवार 7 वाजताच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले. प्रमुख पाहुणे नऊ वाजेपर्यंत येतील असा अंदाज असताना अजित पवार मात्र वेळेत आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यामुळे सुर्यमुखी नाराज झाले असे म्हणत त्यांनी कार्यक्रमासाठी लवकर यावे लागल्याने लोकांची माफी मागितली. सकाळच्या थंडीतच त्यांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणले, लोक म्हणतात हा शपथविधीलाही सकाळीच येतो. अजित पवारांच्या या मिश्कील टिप्पणीने एकच हशा पिकला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कादवा इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचे हित जपण्यासाठी विचारधारा दूर ठेवली.

अजित पवार पुढे म्हणाले, राज्याचे हित जोपासण्यासाठी विचारधारा दूर ठेवल्याचे नाकारता येणार नाही. आपल्या सगळ्यांना माझ्यामुळे सकाळी उठावं लागले त्यामुळे माफ करा. शेतकऱ्यांना कर्ज माफीची अडचण येऊ देणार नाही याची आघाडी सरकार काळजी घेईन अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो. दोन लाखाच्या वरील कर्ज आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पोलीस पाटलांचे थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार असून शिवभोजन थाळीत काही त्रुटी असल्यास आपण त्या सुचवाव्यात असेही त्यांनी सांगितले.

8 हजार पोलिसांची भरती करणार
अजित पवार यांनी यावेळी राज्यात नव्याने 8 हजार पोलिसांची भरती सुरुवातील करणार आहे. इतर विभागातही भरती करणार आहे. 60 ते 70 हजार जागांची भरती करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

टॅक्समधून येणारा निधी कमी पडतोय
पश्चिमेचे पाणी महाराष्ट्रात वळवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. टॅक्सच्या माध्यमातून येणारा निधी कमी पडतोय तरी देखील विकासाची कामे करणार आहे. यावेळी केंद्र सरकारवर टीका करताना अजित पवार म्हणाले, कांद्याचे भाव वाढेल तेव्हा केंद्राने विनाकारण कांदा आयात केला. माझ्या शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत नाही तोच त्यांच्या पोटात का दुखतं.