बॉलिवूडमधील ‘या’ 5 प्रसिध्द जोडप्यांनी सिध्द केलं प्रेम आंधळ असतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिने स्टार्स आपल्या सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतात. काही स्टार्स आपल्या लव लाईफमुळेही चर्चेत असतात. सिने सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी हे सिद्ध केलं आहे की, खरंच प्रेम आंधळं असतं. बॉलिवूडमध्ये 10 स्टार्स असे आहेत ज्यांनी जाती धर्माची भिंत तोडत लग्न केले आहे.

1) शाहरुख खान आणि गौरी- बॉलिवूड किंग शाहरुख खानने गौरी सोबत लग्न केलं आहे. गौरीच्या आईविडिलांना इंप्रेस करण्यासाठी शाहरुखने पाच वर्ष नाटक केलं. शाहरुखने आपलं नावही बदललं होतं. या दोघांच्या प्रेमापुढे त्यांच्या कुटुंबीयांनादेखील झुकावं लागलं. 1991 मध्ये शाहरुख खान आणि गौरीने लग्न केलं.

2) सैफ अली खान आणि करीना कपूर- सैफ आणि करीनाला बॉलिवूडमधील सर्वात कूल कपल मानलं जातं. टशन सिनेमाच्या सेटवर दोघांच्या लवस्टोरीला सुरुवात झाली. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं. 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीना कपूर दोघांनी लग्नगाठ घातली.

3) उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर- 2016 मध्ये 3 मार्च रोजी उर्मिला मातोंडकरने मोहनसीन अख्तर मीर सोबत लग्न केलं. या लग्नात काही मोजकेच लोकं आले होते. 2014 साली उर्मिला आणि मोहसीनची पहिली भेट झाली होती. मनिष मल्होत्राच्या पुतण्याच्या लग्नात ते पहिल्यांदाच भेटले होते.

4) फराह खान आणि शिरीष कुंदर- फराह खानने धर्म आणि जातीची भिंत तोडून दुसऱ्या धर्मातील शिरीष कुंदरसोबत लग्न केले. 2004 साली दोघांनी लव मॅरेज केलं. दोघांच्या वयात 9 वर्षांचे अंतर आहे. शिरीष फराहपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. या दोघांचीही मुलं दोन्ही धर्मांचे शिक्षण घेत आहे.

5) दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम- 22 फेब्रुवारी 2018 रोजी दीपिका कक्करने आपला धर्म बदलून मुस्लिम धर्म स्विकारला त्यानंतर शोएबसोबत लग्न केलं. 2015 पासूनच दोघे रिलेशनशिपमध्ये होते.