पक्षांतर केलेल्यांचा पराभव ‘अटळ’, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा दावा
संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेतील बदलेल्या स्थितीचा अंदाज घेऊन विधानसभेतही तसेच होईल, असा अंदाज घेऊन ज्यांनी पक्षांतर केले, त्यांचा निर्णय १०० टक्के चुकणार आहे. लोकांना हे उड्या मारणे आवडलेले नसून त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.
एका कार्यक्रमासाठी ते संगमनेरला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारण हे केवळ पदाचे नसते तर ते तत्त्वाचेदेखील असायला हवे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सरकारचे भान हरपले असून काही केले तरी लोक आपल्यालाच मते देतात, असा त्यांचा गैरसमज झाला आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांचा हा गैरसमज दूर करेल. पुराकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ, शेतकऱ्यांची दुरावस्था अशा अनेक बाबींमुळे निवडणुकीत त्याचा परिणाम सरकारला भोगावे लागतील.
आपल्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या विरोधात शालिनी विखे यांना उमेदवारी द्यायची का हा निर्णय विखेंचा आहे. असे थोरात यांनी सांगितले.
- आरोग्यविषयक वृत्त
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत