‘या’ मराठी माणसाने दिला 7 वर्ष लढा म्हणून भारतीयांना मिळते रविवारी सुट्टी

वृत्तसंस्था –  आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर रविवार हा सुट्टीचा दिवस असतो हे सर्वांनाच माहीत आहे. रविवारीच सुट्टी असण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? आपल्याला माहीत आहे की  या दिवशी शाळा, कॉलेजेस, बॅंका, सरकारी-खाजगी कार्यालये बंद असतात. या सुटीचा इतिहास काय? रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला? महत्त्वाचे म्हणजे रविवारच्या सुट्टेमागे मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नक्कीच बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत नसेल. म्हणूनच आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.

इंग्रजांच्ये राज्य असताना इंग्रजांच्या काळात जे मील कामगार होते त्यांना सातही दिवस काम करावे लागत असे. आठवड्यातून एकही दिवस त्यांना सुट्टी नसायची. प्रत्येक रविवारी ब्रिटिश अधिकारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात असत. परंतु कामगारांसाठी असं काहीच नसायचं. त्यावेळी कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे हे होते. मुंबईत १८८४ मध्ये  नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हॅण्ड्‌स असोसिएशनची स्थापना केली. आणि पहिल्यांदाच त्यांनी साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव इंग्रजांसमोर ठेवला. आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे करण्यासाठी मिळावा असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. इतकेच नाही तर रविवार खंडोबा या देवाचा हा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी अशी मागणी करण्यात आली.
२४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. लोखंडे यांनी केलेला तीव्र संघर्षाची दखल घ्यावी लागली. नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी तब्बल सात वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. त्यानंतर अखेर मिलमालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली. १८८४मध्ये रविवारच्या सुट्टीसाठी सुरू झालेला संघर्ष १० जून १८९० रोजी संपला.
कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे ?
सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुटीचं नातं जोडलं गेलेय ते भारतातल्या कामगार चळवळीचे पहिले नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच. आणि म्हणूनच भारतीयांना हक्काची रविवारची सुट्टी मिळण्यात एका मराठी व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. लोखंडे यांनी कामगारासाठी १८८४मध्ये जो लढा दिला त्यात त्यांनी अनेक आंदोलने केली. तब्बल सात वर्ष हा लढा सुरूच होता. इंग्रजांच्या गु लामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही भारतामध्ये आजही रविवारची सुट्टी आहे. अखेर १० जून १८९० रोजी इंग्रंज सरकारने भारतीयांना रविवारची सुट्टी जाहीर केली. मुख्य म्हणजे लोखंडे महत्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. उल्लेखनीय बाब अशी की, २००५ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टाचे तिकीट जारी केले होते. इतकेच नाही तर नारायण मेघाजी लोखंडे यांना ट्रेड यूनियन आंदोलनाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
म्हणून काही पाश्चिमात्य देशात रविवारी सुट्टी?
सृष्टी निर्माणाबद्दल बायबलमध्ये खास उल्लेख करण्यात आला आहे.  सहा दिवसात सृष्टी निर्माण केल्यावर देवाने सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाश्चिमात्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असाच असतो आणि त्यामुळे सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात. इतकेच नाही तर चर्चमध्ये रविवारी सकाळी सकाळी जाऊन प्रार्थना करतात. मु्ख्य म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असतो.