टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदासाठी वीरेंद्र सेहवागसह ‘या’ 3 नावांची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय)चा अध्यक्ष सौरव गांगुलीसमोर टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुख पदी दुसरा सक्षम पर्याय शोधण्याचं मोठं आव्हान आहे. कारण टीम इ़ंडिया निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. अवघ्या 6 कसोटी आणि 17 वन डे सामन्यांचा अनुभव असणाऱ्या प्रसाद यांना अनेकदा या गोष्टीरून टीकेचा धनी व्हावं लागलं आहे. त्यांचा कार्यकाळ अनेकदा वादाच्या भोवऱ्यामुळेच चर्चेत राहिला आहे. असे असले तरी टीम इंडियानं त्यांच्या कार्यकाळात 2016 ते 2019 या कालावधीत सर्व फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

टीम इंडियाला प्रसाद यांच्या जागी लवकरच नवीन निवड समिती अध्यक्ष लाभणार आहे. यासाठी दिलीप वेंगसरकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि अन्य काही खेळाडूंची नावे चर्चेत आहेत. बीसीसीआयनं मात्र अद्याप यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु केलेली नाही. असे असले तरी या शर्यतीत भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्यासह तिघांचं नाव शर्यतीत आहे.

वीरेंद्र सेहवागनं एमएसके प्रसाद यांच्यावर सर्वाधिक टीका केली आहे. भारताच्या माजी फलंदाजाकडे 104 कसोटी आणि 251 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. त्यानं कसोटीत 8586 आणि वन डेत 8273 धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकवणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्यानं 4 कसोटी, 12 वन डे आणि 1 ट्वेंटी 20 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्वही केलं आहे. 2017 मध्ये त्यानं प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता.

लक्षमण शिवरामकृष्णन या शर्यतीत आघाडीवर आहे. 1980च्या दशकात त्यानं 9 कसोटी आणि 16 वन डे सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. 1983 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी त्यानं कसोटी संघात पदार्पण केलं होतं. त्यात त्यानं सर्वात युवा कसोटीपटूचा मान पटकावला होता. 1989 मध्ये सचिन तेंडुलकरनं हा विक्रम मोडला.

वेंकटेश प्रसाद शर्यतीत तिसरा आहे. असे असले तरी त्यानं टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षकपद भूषवलं आहे. तो कनिष्ठ निवड समितीचा अध्यक्षही होता. 2018 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजेत्या टीम इंडियाचा तो निवड समिती प्रमुख होता.

Visit : Policenama.com