नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांद्याच्या दरवाढीनंतर सध्या टोमॅटोचे दर चांगलेच वाढत आहेत नवी दिल्ली आणि महाराष्ट्रात सध्या टोमॅटोचा भाव 80 रुपए प्रति किलो वर येऊन पोहचला आहे. दिल्लीच्या निवडणुकांना जरी अजून वेळ असला तरी महाराष्ट्रात मात्र यावरून चांगलेच राजकारण तापू शकते. एक नजर टाकुयात टोमॅटोच्या वाढत्या दरावर.
दिल्ली आणि महाराष्ट्रातील टोमॅटोचे दर
महाराष्ट्रामध्ये सध्या टोमॅटोचा दर 80 रुपए प्रति किलो झाला आहे. त्यातच जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आहे त्यामुळेच सतत टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये टोमॅटोची किंमत 60 रुपए प्रति किलो पेक्षा अधिक आहे. गुरुवारी मदर डेअरीच्या आउटलेटवर टोमॅटोचे दर 62 रुपए प्रति किलो होते. तसेच टोमॅटोच्या स्थानिक बाजारातील होलसेल किमती 70 रुपए प्रति किलो आहेत.
शेतकऱ्यांना मात्र काहीच फायदा नाही
टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होतात दिसत नाही. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये नेहमी 200 ते 300 पोती भरून टोमॅटो येत असे मात्र आता त्यांची संख्या कमी होऊन 100 ते 150 इतकी झाली आहे. ज्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे.भाजी विक्रेत्यांच्या मते पावसामुळे टोमॅटोच्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.
visit : policenama.com
- तुमच्या मनाला आवडणारे उपाय करून सांभाळा फिटनेस, असा होईल फायदा
- केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘हे’ उपाय करून दूर करा समस्या
- मोजे काढताच पायांची दुर्गंधी येत असल्यास करा ‘हे’ खास उपाय, समस्या होईल दूर
- हे’ फळ खाल्ल्यानंतर कधीही पिऊ नका पाणी, जाणून घ्या कारण
- असे ठेवा तुमच्या रागावर नियंत्रण, या खास टिप्स नेहमी ठेवा लक्षात
- या’ सवयी असतील तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो ‘ब्लॅडर कॅन्सर’
- ‘हे’ १० गंभीर आजार ऐन तारुण्यातही मुला-मुलींना होऊ शकतात, अशी घ्या काळजी
- मासिक पाळी उशिरा येण्यासाठी करा ‘हे’ ८ नैसर्गिक उपाय, ‘नो साइड इफेक्ट’
- बॉडी बनविण्यासाठी घाम गाळायची गरज नाही, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा
- ‘हे’ मधुमेहावर आहे रामबाण औषध, ‘हा’ सोपा उपाय करा, जाणून घ्या इतर फायदे