‘ट्रॅजिडी क्वीन’ मीना कुमारीनं सोसलंय ‘ट्रिपल तलाक’चं दु:ख, झीनत अमानच्या वडिलांसोबत झाला होता ‘हलाला’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूडची ट्रॅजिटी क्वीन मीना कुमारी हिनं आजच्या दिवशी(दि 31 मार्च) जगाचा निरोप घेतला होता. लाखोंच्या मनात राज्य करणाऱ्या मीना कुमारीनं तिच्या आयुष्यात खूप दु:ख झेललं आहे. आपल्या सौंदर्यांनं आणि लुकनं साऱ्यांना भुरळ घालणाऱ्या मीना कुमारीनं ट्रिपल तलाक आणि हलालाचं दु:ख सोसलं आहे.

https://www.instagram.com/p/B-X1h9WB42B/

प्रत्येक अॅक्टर आणि डायरेक्टर मीना कुमारीचा फॅन होता. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक तरसत असे. 1951 मध्ये तमाशा या सिनेमाच्या सेटवर मीना कुमारीची भेट प्रसिद्ध डायरेक्टर कमाल अमरोहीसोबत झाली. ही भेट प्रेमात बदलली. 1952 साली दोघांनी निकाह केला. मीना कुमारी कमालची तिसरी पत्नी होती. 1964 दरम्यान दोघांच्या कटुता आली आणि दोघं वेगळे झाले. कमालनं रागात येऊन तिला ट्रिपल तलाक दिला. नंतर त्याला जाणीव झाली की, मीना त्याला परत हवी आहे. परंतु त्यावेळी तिला हलाला या प्रथेचा सामना करावा लागणार होता.

कमालनं त्याचा मित्र आणि झीनत अमानचे वडिल अमानउल्लाह खानसोबत मीनाचा हलाला केला. यानंतर एका महिन्यानं मीना आणि कमाल यांचा पुन्हा निकाह झाला. मीना पुन्हा एकदा कमालकडे आली परंतु ती आतून पूर्णपणे तुटलेली होती. मीना कुमारीनं लिहिलं होतं की, “धर्माच्या नावाखाली मला दुसऱ्या माणसाकडे सोपवलं गेलं तर मग माझ्यात आणि वेश्येत काय फरक राहिला.” यानंतर मीना दारूच्या आहारी गेली. 31 मार्च 1972 रोजी मीना कुमारीनं सेंट एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला होता.

https://www.instagram.com/p/B-NLZJihAUB/