पुणे (भोर) : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्ता खचल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वरंधा घाटातून होणारी वाहतूक दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील रस्ता ४ ऑगस्ट रोजी खचला आहे. वरंधा घाटातील रस्ता अनेक ठिकाणी खचला असून काही ठिकाणी दरडी पडल्या आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि दरडी काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. घाटातील भोर तालुक्याच्या बाजूला असलेल्या रस्त्याचे काम पुढील पंधरा दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, महाडच्या बाजूकडील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मोठे असल्याने त्याला दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वरंधा घाटातील घाटमाथ्याजवळ मोठ्या वळणावरती रस्ता खचला आहे. तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा रस्ता ४ ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होईल असे ही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- कारल्याची पाने अनेक आजार करतात गायब, ‘हे’ उपाय करून पहा
- दिवसभरात ‘या’ ७ चुकांमधून केली एक चुक, तर होऊ शकतो ‘डायबिटीज’
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या