नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी तीन तलाक विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. वादळी चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही तीन तलाक विधेयकाला मंजुरी मिळाली होती. या विधेयकाच्या समर्थनार्थ ३०३ आणि विरोधात ८२ मते पडली आहेत. काँग्रेस, डीएमके, एनसीपी, टीडीपी, आणि जेडीयू या पक्षांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. या विधेयकाला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला. विधेयकावर मतदान सुरू होण्याआधी निषेध करत जदयु, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. बीजू जनता दलाने विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
विधेयकामध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेली दुरुस्ती रद्द करण्यात आली आहे. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. आता या विधेयकाची राज्यसभेत परीक्षा असेल. याच अधिवेशनात हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. या अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. हे अधिवेशन आता ७ ऑगस्ट पर्यंत सुरु राहील.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तीन तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. परंतु राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली नव्हती. यानंतर सरकारने तीन तलाक विधेयकासंबंधी अध्यादेश काढला होता. तीन तलाक विधेयकासंबंधी विरोधी पक्षांच्या खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना कायदा मंत्री रवीशकुमार यांनी उत्तर दिले.
- हृदयाला बळ आणि मेंदूला स्फूर्ती देते ‘हे’ फळ, जाणून घ्या फायदे
- योग करा आणि घ्या प्रणयाचा आनंद, शरीर आणि मन होईल तरुण !
- एका आठवड्यात कमी करा साडेचार किलो वजन ! करून पाहा ‘हे’ उपाय
- ‘अॅक्रो योग’ माहित आहे का ? जाणून घ्या माहिती आणि विविध फायदे
- ‘सकाळ-संध्याकाळ’ भेंडी खा, वजन होईल कमी, प्रोटीनसह इतर फायदे, जाणून घ्या
- ‘ही’ योगासने करून प्राप्त करू शकता तजेलदार आणि निर्मळ त्वचा