दहशतावाद्यांना घुसून मारणं ही भारताची नीती : नरेंद्र मोदी

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूरच्या लोकांनी मोठ्या संकटांना तोंड दिलं आहे. विश्वास ही ५ वर्षातील सर्वात मोठी कमाई आहे. विकास करून विश्वास सार्थ ठरविणार. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग हवा आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर घुसून मारणं ही नवीन भारताची निती आहे. परंतु विरोधकांना आमच्यावर विश्वास नाही. असे नरेंद्र मोदी औसा येथील सभेत म्हणाले.

नक्षलवाद्यांवर प्रहार आणि आदीवासी बंधूंना विश्वास दिला आहे. नक्षलमुक्त भारताचं आमचं स्वप्न आहे. भारताच्या संस्कृतीचे जगभरात दर्शन केले. तुमचा आशिर्वाद हीच माझी ताकद आहे. तुम्हाला चौकीदारावर विश्वास आहे का ? राष्ट्र सुरक्षेसाठी आमचं काम आणि निर्धार आहे. कॉंग्रेसचा विचार देशविरोधी आहे. काश्मीरमधून कलम ३७० काढलं जाणार नाही. कॉंग्रेसचा जाहीरनामा बोलतो तीच भाषा पाकिस्तानची भाषा आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसा करणाऱ्यांशी बोलणी करण्याची भाषा कॉंग्रेसची आहे. तीच भाषा पाकिस्तानची आहे. देशाला शिव्या देणाऱ्या, तुकडे करणाऱ्यांना खुलं लायसन्स देण्याची घोषणा कॉंग्रेस करत आहे. तीच पाकिस्तानची इच्छा आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आजकाल हे लोक माझ्या मागे लागले आहेत. भारताने पाकिस्तानचं कोणतही विमान पाडलं नाही असा आरोप माझ्यावर करत आहेत. तुम्हाला देशाच्या लष्कराकडून किती पुरावे पाहिजेत. ज्या दिवशी एअरस्ट्राईक झाली. ज्यांना आपल्याच सैनिकांवर विश्वास नाही. त्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्यांची जमानत जप्त व्हावी अशी परिस्थिती निर्माण करा. तुमच्या चौकीदाराने यांच्या सर्व जुन्या खेळांना रोखले आहे. देशाचं हित आणि जनता यांना समोर ठेवून काम करत आहोत.