Bigg Boss 14 : बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच पालटणार ‘सीन’, एक्स स्पर्धकदेखील जिंकू शकतात ट्रॉफी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14’च्या सुरूवातीपासूनच एकामागोमाग एक नवे ट्विस्ट येत आहेत. शोमधून एका स्पर्धकाचे वॉकआऊट करणे, लवकरच ‘बिग बॉस’चा फिनाले येणे आणि बिग बॉस एक्स स्पर्धक पुन्हा गेममध्ये परत येणे.. पूर्वीच्या सीझनमध्ये हेे पाहिले गेेले नव्हते. पण या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एक्स स्पर्धक विकास गुप्ता, काश्मिरा शहा, राहुल महाजन, मनु पंजाबी, अर्शी खान आणि राखी सावंत घरात आधीपासूनच असणाऱ्या स्पर्धकांसोबत खेळणारच नाहीत तर ते शो देखील जिंकू शकतील.

सहसा प्रत्येक हंगामात असे घडते की बिग बॉस एक्स स्पर्धक काही वेळ शोसाठी येतात आणि नंतर निघून जातात, परंतु यावेळी सीन पलटणार आहे. होय, सलमान खानने स्वतः जाहीर केले आहे की बिग बॉसच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे जेव्हा बिग बॉस एक्स स्पर्धकांनाही विजेते होण्याची संधी दिली जात आहे. वीकेंड का वारमध्ये सलमान म्हणाला, “आतापर्यंत या कार्यक्रमात कधीच एक्स स्पर्धक विजेता नव्हता, परंतु यावर्षी असे होऊ शकते. यावेळी बिग बॉस एक्स स्पर्धक चॅलेन्जर घरी येत आहे, तो ट्रॉफी देखील जिंकू शकेल.

दरम्यान, ‘बिग बॉस’ चा हा आठवडा फिनाले होता. हा शो अद्याप संपणार नसला तरी, आता घरी उपस्थित असलेले फक्त चार सदस्य पुढे जातील. एजाज आणि अभिनव घराचे दोन फायनलिस्ट झाले आहेत. दुसरीकडे, रुबीना दिलक, जस्मीन भसीन, राहुल वैद्य यांतील एक सदस्य आज बेघर होणार असून उर्वरित चार जण खेळतील. आता बिग बॉसचे काही जुने स्पर्धक या चार जणांना स्पर्धा देण्यासाठी येत आहेत. ज्यात विकास गुप्ता, काश्मिरा शाह, राहुल महाजन, मनु पंजाबी, अर्शी खान आणि राखी सावंत यांचा समावेश आहे.