मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीवर अनेक मालिका सुरु होतात बंद होतात. काही मालिका वर्षानुवर्षे सुरु आहेत. काही मालिका अशा आहेत ज्या एक वर्षही चालल्या नाहीत. गेल्या काही महिन्यात कमी टीआरपी मुळे अनेक मालिका बंद झाल्या आहेत, काही होणार आहेत. हैराण करणारी बाब अशी की, या मालिकांनी लाँच होण्याआधी खूप पब्लिसिटी मिळवली परंतु टेलीकास्ट झाल्यानंतर यांचा काहीच पत्ता दिसला नाही. अशाच मालिकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आधी जबरदस्त चर्चेत आल्या परंतु वर्षभरही चालल्या नाहीत.
१) एक भ्रम… सुवर्णयुग संपन्न
२२ एप्रिल २०१९ रोजी लाँच झालेली मालिका एक भ्रम… सुर्वणयुग संपन्न बंद होणार आहे. श्रेनु पारिख आणि जैन इमाम स्टारर या मालिकेचा शेवटचा एपिसोड १४ सप्टेबंर २०१९ रोजी टेलीकास्ट होणार आहे. प्रतिसाद न मिळाल्याने हा शो ५ महिन्यातच बंद होणार आहे.
२) दिल तो हैप्पी है जी
याच वर्षी १५ जानेवारी रोजी लाँच झालेला हा शो बंद करण्यासाठी अचानक निर्णय घेण्यात आला आहे. शोचा शेवटचा एपिसोड ९ ऑगस्ट रोजी टेलीकास्ट झाला होता. स्टारकास्टही हे ऐकून हैराण आहेत.
३) केसरी नंदन
ही मालिका दंगल सिनेमाला प्रेरीत असून खूप जोशात लाँच झाली होती. परंतु टीआरपी न मिळाल्याने हा शो वर्षभरही चालला नाही. १ जानेवारी २०१९ रोजी लाँच झालेली ही मालिका २६ जुलै रोजी बंद झाली आहे.
४) विष या अमृत : सितारा
अदा खानची मालिका विष या अमृत : सितारा मागील वर्षी ३ डिसेंबर रोजी लाँच झाली होती. परंतु कमजोर स्टोरी आणि घटत्या टीआरपीमुळे ही मालिका ७ जून २०१९ रोजी बंद करण्यात आली.
५) झांसी की रानी
राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत मालिका झांसी की रानी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच झाली होती. कमी टीआरपी असल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. जुलैमध्ये ही मालिका ऑफएअर करण्यात आलीत.
६) हर साख पर उल्लू बैठा है
स्टार प्लस वरील मालिका हर साख पर उल्लू बैठा है मध्ये राजकारणातील डावपेच कॉमेडी पद्धतीने दाखवले होते. परंतु प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास असमर्थ ठरल्याने अवघ्या ७ महिन्यात ही मालिका बंद करण्यात आली.
७) दास्तां ए मोहब्बत- सलीम अनारकली
सलीम-अनारकलीच्या अमर प्रेम कहानीमध्ये शाहिर शेख आणि सोनारिका भदोरिया लीड रोलमध्ये होते. धमाकेदार प्रमोशन आणि भव्य सेट असूनही ही मालिका हिट झाली नाही. आळशी कहानीमुळे शोचा टीआरपी कमी झाला. मागील वर्षी १ ऑक्टोबर रोजी ही मालिका लाँच झाली होती. ४ जानेवारी २०१९ रोजी ही मालिका बंद झाली होती.
८) लाडो
लाडो मालिकेचा पहिला सीजन खूपच हिट झाला होता. परंतु दुसरा सीजन मात्र सपशेल फ्लॉप झाला. शोची स्टोरी प्रेक्षकांना आवडली नाही. अम्माजीचा रोलही संपवला गेला. यानंतर मेघना मलिकने ही मालिका सोडली. टीआरपी पडल्याने ७ महिन्यात ही मालिका बंद झाली.
- कारल्याची पाने अनेक आजार करतात गायब, ‘हे’ उपाय करून पहा
- दिवसभरात ‘या’ ७ चुकांमधून केली एक चुक, तर होऊ शकतो ‘डायबिटीज’
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या