शिक्षक भरतीवरुन विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांच्यात ट्विट वॉर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रात रखडलेल्या शिक्षक भरतीवरून शिक्षणमंत्री विनोद तावडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे असा ट्विट वॉर ट्विटरवर सध्या चांगलाच रंगलाय. या दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध रंगले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून #जवाबदो या हॅशटॅग अंतर्गत मोहिम सुरु केली आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी शिक्षक भरतीचा मुद्दा घेऊन ट्विट केले. त्याला विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. यावर येत्या सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांच्या जागा भरणार अशी घोषणा तावडे यांनी केली होती. ही घोषणा फेब्रुवारी महिन्यात तावडे यांनी केली होती. पण अजूनदेखील शिक्षक भरती झाली नसल्यामुळे तावडे यांना राष्ट्रवादीने धारेवर धरले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b846be76-c566-11e8-9b02-61c2f27cc9e7′]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं ट्विट

राज्यात 24 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेब्रुवारीत केली होती. अद्याप ही शिक्षक भरती झालेली नाही. दिवसरात्र या भरती परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? #जवाबदो असं ट्विट खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलं.

राज्यात २४ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री @TawdeVinod यांनी फेब्रुवारीत केली होती. अद्याप ही शिक्षक भरती झालेली नाही. दिवसरात्र या भरती परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत?#जवाबदो . अशा प्रकारचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

 

विनोद तावडे यांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ट्विटला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं.

“15 वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी एकही पद भरले नाही. आज बहुतांश संस्थांचालक यांचेच आहेत. जे कोर्टात जाऊन सरकारच्या ऑनलाईन भरतीवर स्थगिती आणतात. मराठा आरक्षण हा मुद्दा आणून भरती पुढे ढकलतात. वर यांचेच नेते शिक्षक भरती होत नाही अशी सोशल मिडीयावर टिवटिव करतात.

शिक्षणात राजकारण केलेले खपवून घेणार नाही. संस्थाचालकांनी कितीही प्रयत्न केले आणि विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी आमचे सरकार शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी खंबीरपणे उभे आहे. पद भरती होणार होणार होणार!” असं ट्विट विनोद तावडे यांनी केले.

[amazon_link asins=’B07417987C,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ff9edf5-c565-11e8-b915-6553b968d347′]

 

१५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी एकही पद भरले नाही. आज बहुतांश संस्थांचालक यांचेच आहेत. जे कोर्टात जाऊन सरकारच्या ऑनलाईन भरतीवर स्थगिती आणतात. मराठा आरक्षण हा मुद्दा आणून भरती पुढे ढकलतात. वर यांचेच नेते #शिक्षकभरती होत नाही अशी सोशल मिडीयावर टिवटिव करतात.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5b6f0b0e-c566-11e8-b914-935ae2d8cadb’]

[amazon_link asins=’B0146QJTDC,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9590651-c566-11e8-a2db-c1fde78c097c’]

शिक्षणात राजकारण केलेले खपवून घेणार नाही. संस्थाचालकांनी कितीही प्रयत्न केले आणि विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी आमचे सरकार शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी खंबीरपणे उभे आहे. पद भरती होणार होणार होणार!#शिक्षकभरती

जाहिरात