अडीच क्विंटल गांजा जाळुन केला खाक…

जालना : पोलीसनामा ऑनलाईन –  जालन्यात तब्बल अडीच क्विंटल गांजा पोलासांनी बुधवारी जाळुन खाक केला असून, हा गांजा पोलीसांनी जप्त केला होता. या प्रकरणी न्यायालयाने निकाल ही दिला आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक चैतन्य एस.अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांच्या पोलीस ठाण्याचे सात पोलीस निरीक्षक,प्रयोग शाळेचे तज्ञ यांच्या उपस्थीतीत हा अडीच क्विंटल गांजा नष्ट करण्यात आला. गांजा जाळल्या नंतर त्याची एका खड्यात विल्हेवाट लावण्यात आली.हा गांजा २००५ ते २०१५ या कालावधीमध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील होता.अशी माहीती चैतन्य एस.यांनी दिली.