सुहागरात्रीच्या पुर्वीच वधू बोलेरो गाडी घेवून झाली फरार, काही तासांपुर्वीच झाला होता ‘चट मंगनी पट ब्याह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आग्रा जिल्ह्यातील बाह भागात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे सुहागरातच्या आधीच दोन वधू घरातून फरार झाल्या. कुटुंबाला हे कळताच त्यांना धक्का बसला. दोन्ही वधूंनी त्यांच्याबरोबर रोकड व दागिनेही घेतले आहेत.

घडले असे की, बाह परिसरातील फरैरा गावातील सख्ख्या भावांचे गुरुवारी सोनभद्र जिल्ह्यातील पाकरहाट गावात राहणाऱ्या सख्ख्या बहिणींशी लग्न झाले होते. शुक्रवारी शौचालय जाण्याच्या बहाण्याने दोन्ही वधू रोकड व दागिने घेऊन फरार झाल्या. पीडितेचे कुटुंब बिचौलिया आणि दोन मुलींच्या शोधात आहे. पीडितेच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, आग्रा येथील दयालबाग येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने सख्ख्या भावांचे लग्न नौदिहा (सोनभद्र) या पाकराट गावात राहणाऱ्या सख्ख्या बहिणींशी ठरवले होते. फरैरामधील मुलींना दाखवल्यानंतर गुरुवारी लगेच साखरपुडा आणि लग्न उरकून घेतले.

शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने बाहेर गेल्या होत्या दोन्ही वधू
शुक्रवारी रात्री दोन्ही नववधू शौचाच्या बहाण्याने आपल्या सासूसमवेत घराबाहेर पडल्या. एक बोलेरो गाडी आधीच वाटेवर उभी होती, ज्यामध्ये बसून त्या दोघी पळून गेल्या. सासूने घरी आल्यावर घटनेची माहिती दिली असता, नातेवाईकांना मोठा धक्का बसला. जेव्हा गावातील लोकांना हे कळले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले.

पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे की, दोन्ही वधूंनी घरात ठेवलेले 50 हजार रुपये, मंगळसूत्र व सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पाजेब सोबत घेऊन गेले आहेत. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची गोष्ट सांगितली आहे. मात्र, प्रभारी बीआर दीक्षित यांनी अशा प्रकारची कोणतीही घटना नाकारली आहे.