मोठ्या भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात लहान भावाचाही मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

किरकोळ कारणावरुन दोन भावांची भांडण झाले. याच भांडणाच्या रागातून मोठा भाऊ आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावरुन धावत गेला. त्याला वाचवण्याच्या प्रत्नात लहान भाऊ देखील त्याच्या मागे धावला. मात्र, भरधाव वेगात आलेल्या रेल्वेने दोन्ही भावांना चिरडले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आकाश बागुल आणि जयेश बागुल अशी या दोघांची नावे आहेत.
[amazon_link asins=’B07417987C,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6be95534-b4ee-11e8-bf68-e50fa67980e9′]
आकाश आणि जयेश यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्या रागातून मोठा भाऊ जयेश हा आत्महत्या करण्यासाठी गेला. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी लहान भाऊ आकाश त्याच्या मागे गेला. मोठा भाऊ पळत होता त्याच्यामागे त्याला असे करू नकोस असे सांगत लहान भाऊही पळू लागला. मात्र, रेल्वेखाली चिरडून या दोघांचाही मृत्यू झाला.

या दोघांचे मृतदेह घाटी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जयेश बागुल कंत्राटी काम करत होता. त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते अशीही माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

Please Subscribe Us On You Tube