सहारनपूर (उत्तर प्रदेश): वृत्तसंस्था – पत्रकार आणि त्याच्या सख्ख्या भावाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहारनपूर जिल्ह्यातील कोतवाली परिसरात किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला.
Journalist Ashish Janwani and his brother shot dead by unidentified assailants in Saharanpur. Police begin investigation. pic.twitter.com/NsWtcrDhxO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 18, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूर जिल्ह्यातील कोतलवाली परिसरामध्ये राहणाऱे पत्रकार आशीष आणि त्यांचा भाऊ या दोघांचे गावातील एका व्यक्तीसोबत जमीनीचे वाद होते. या वादातून आज सकाळी दहाच्या सुमारास दोघांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. दोघांना गोळी मारल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मयत आशिष हे मेरठ येथील एका वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करत होते.
पोलिसांनी दोन्ही भावांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र अद्याप आरोपींचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमीक तपसात दोघांचा खून जमीनीच्या वादातून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम