ताम्हीणी घाटात आढळले जळालेल्या अवस्थेतील दोन मृतदेह

मुळशी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटामध्ये वॅगन आर कारमध्ये दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विजय आबा साळुंके (वय ३५, मु पो बांदा, जिल्हा.सिंधुदुर्ग), विकास विलास गोसावी (वय ३२ मूपो. निप्पणी, जिल्हा कोल्हापूर) मृतांची नावे आहेत. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता यावेळी पोलिसांनी व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील ताम्हीणी घाटात एका वॅगन आर गाडीमध्ये दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. ९० टक्के भाजल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोघांचा घातपात झाला असल्याची शक्यता असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघांचीही बेपत्ता असल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?

आगामी विधानसभेसाठी राजू शेट्टींचं ‘मिशन ४९