PAK : इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायोगात काम करणारे 2 बडे अधिकारी बेपत्ता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायोगात काम करणारे दोन भारतीय अधिकारी बेपत्ता आहेत. हे दोन्ही अधिकारी गेल्या दोन तासांपासून बेपत्ता आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, सूत्रांकडून ही माहिती मिळाली असून या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Two Indian officials working with Indian High Commission in Islamabad (Pakistan) are missing: Sources
— ANI (@ANI) June 15, 2020
हे प्रकरण नुकतेच उघडकीस आले, जेव्हा भारताने नवी दिलीत पाकिस्तान उच्चायोगात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली देशातून काढून टाकले होते. या घटनेनंतर पाकिस्तानने या महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी अधिकाऱ्याला बोलावून भारताच्या निर्णयावर कडक आक्षेप नोंदवला होता.
त्यावेळी भारताने हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायोगाच्या दोन अधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला होता. नंतर हे उघड झाले की, पाकिस्तानच्या दोन अधिकाऱ्यांचा उद्देश ट्रेनमधून सैन्याच्या तुकड्यांच्या हालचालीची सविस्तर माहिती मिळवण्याचा होता.