दुर्दैवी ! अन्नदान करून परतणारी रिक्षा उलटली, 2 जण ठार

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे अनेकजण एकमेकांना मदत करीत आहेत. अंमळनेरमध्ये गरजूंना अन्नदान करून परतत असताना रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत.  तर तीन जण गंभीर जखमी झाले. मुडी येथून परतत असतांना झाडी गावाजवळ अचानक त्यांची रिक्षा उलटून अपघात झाला

ऋषिकेश उमेश शेटे आणि विशाल दिनेश पाटकरी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी जयेश पाटील याची प्रकृती चिंताजनक आहे. तर  अक्षय महाजन आणि चेतन चौधरी हे किरकोळ जखमी असून जखमींना धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनामुळे राज्यात टाळेबंदी असल्यामुळे हातावर पोट असणार्‍या लोकांचे हाल होत आहेत. अशाच लोकांना मदत करण्यासाठी आठजण दुसर्‍या गावात गेले होते. त्याठिकाणी मदत करुन माघारी परतत असताना अपघात झाला. अमळनेर येथील श्रीरामनगर परिसरातील घडलेल्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.