‘मॉब लिंचिंग’मध्ये तिघांचा मृत्यू, बिहारमधील छपर्यात चोरीच्या घटनेचं प्रकरण
बिहार : वृत्तसंस्था – देशात मॉब लिंचिंगचे प्रकार वाढले आहेत. बिहारमधील सारण जिल्ह्यात मॉब लिंचिंगचा प्रकार घडला आहे. गायी-गुरे चोरी करण्याच्या संशयावरून शुक्रवारी काही लोकांना मारहाण करण्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत ३ लोकांचा जीव गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील वातावण तापलेले असून पोलीसांनी या घटनेची त्वरीत दखल घेतली आहे.
रात्री पिकअप गाडी घेऊन येतात आणि गायी-गुरांना चोरी करण्याच्या घटना घडत होत्या. स्थानिक लोकांना यांसंबधी माहिती मिळाली होती. त्यानंतर या माहितीवर कोणतीही ठाम माहिती न मिळवता या तीन संशयित लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या तिघांसोबत अजून एक व्यक्ती होता. मात्र तो या हारहाणीतून पळ काढण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे.
Bihar: Two people were beaten to death by locals in Baniyapur, Saran on suspicion of cattle theft, today morning. Bodies sent for postmortem by police, investigation underway.
— ANI (@ANI) July 19, 2019
स्थानिक लोकांनी या संशयित चोरांना एवढे मारले की त्यात त्यांच्या मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी या चोरांची गाडी आपल्या ताब्यात घेत घटनेची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. सध्या त्यांचे पोस्टमार्टम सुरू आहे. तर मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबातून दुःख व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, देशात मॉब लिंचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कालच म्हणजे १८ जुलै रोजी मध्य प्रदेशमध्ये बकरी चोरीच्या आरोपावरून तीन तरूणांना मारहाण करण्यात आली होती. तसंच या युवकाच्या बाईकला आग लावण्यात आली होती. या प्रकरणी पोलीसांनी या तीन तरुणांसह त्यांना मारणाऱ्या ५ लोकांना अटक करण्यात आली होती. तसंच आता पोलीस बिहारमधील घटनेत काय भूमिका घेत कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
- ‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या
- मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या
- ‘ही’ उत्तम आरोग्याची ६ लक्षणे, जाणून घ्या तुम्ही किती निरोगी
- ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्याने वाढेल पुरुषांमधील ‘स्टॅमिना’
- महिलांनी ‘ही’ ४ योगासने केल्यास ब्लडप्रेशर (BP) होईल कमी
- जाणून घ्या, कुठलं खाद्यतेल आरोग्यासाठी किती पोषक ?