गेल्या 8 वर्षापासून IAS आणि IPS अधिकारी बनून ‘साहेब’गिरी करत त्यांनी घातली अनेकांना ‘टोपी’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएएस आणि आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करत दोन व्यक्तींनी मागील आठ वर्षांपासून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. नोयडा पोलिसांनी या दोघा महाभागांना ताब्यात घेतले आहे.
अशुतोष राठी आणि गौरव मिक्षा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरोधात पोलिसांकडे खंडणी मागत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांना सेक्टर १८ मधील मेट्रो स्टेशनवर अटक करण्यात आली. या दोघांची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून खाकी गणवेश, आयएएस, आणि आयपीएस बँजेस आणि बनावट ओळखपत्र जप्त केले.
https://twitter.com/ANINewsUP/status/1157082064241463301
ज्या व्यक्तींनी या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला आहे की, या आयएएस आणि आयपीएस असल्याची बतावणी करणाऱ्या दोघांनी राजकीय नेत्यांचे नाव घेऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. याशिवाय या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे देखील काम केले. नोयडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक वैभव कृष्णा यांची ही माहिती दिली.
दिल्लीत याआधी देखील अशाच घटनांमधून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिल्लीत जो प्रकार घडला होता. यात दि्ल्ली पोलिसांची भरती परिक्षा पास होत नसल्याने एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर आणि नातेवाईकांवर छाप पाडण्यासाठी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली होती. या तरुणाचे नाव आशिष चौधरी असे नाव असून दिल्ली पोलिसांकडून त्यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.
- दिव्यांच्या अमावास्येला ‘अशी’ करा दिव्यांची स्वच्छता
- ‘या’ गंभीर आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी वेळेत करा ‘या’ १० तपासण्या
- कॅन्सरसह ‘या’ गंभीर आजारांवर ‘काळे जिरे’ गुणकारी, जाणून घ्या
- बॅड कोलेस्टेरॉलसाठी कर्दनकाळ आहेत ‘या’ ७ भाज्या, जाणून घ्या
- दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या
- ‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !
- लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा
- ‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
- ‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा
- ‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या