Kolhapur News : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील अपघातात 2 तरूण ठार, हाताची हळद निघण्यापुर्वीच काळानं घातला सांगलीच्या युवकावर घाला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर ( Kolhapur-Ratnagiri Raod accident)वाघबीळ नजीक रविवारी (दि. 10) मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. यातील एकाचा दहा दिवसापूर्वीच विवाह झाला होता. अंगाची हळद निघण्या आधीच काळाने त्याच्यावर काळा घातला आहे. या घटनेने बावडा परिसरावर शोककळा पसरली आहे.

विशाल आबासाहेब हाके ( वय 29, रा. कवलापूर जि. सांगली ) आणि नितीन आबासाहेब रणदिवे ( वय 30, रा. रणदिवे गल्ली (पुर्व) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन व विशाल हे रविवारी रात्री 11 च्या सुमारास दुचाकीवरून विशाळगडकडे चालले होते. वाघबीळच्या पुढे आशिष लाॅजच्या समोरील वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरघाव ट्रकने जबर धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला विशाल याचा दहा दिवसापूर्वीच विवाह झाला असून तो बावडा येथे मामाकडे रहायला होता. विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली आहे, ती परत येण्यापूर्वीच पतीच्या निधनाची बातमी तिला ऐकण्याची वेळ आली. तर नितीन रणदिवे हा बावडा परिसरातील नावाजलेला क्रिकेटपटू होता, तो विवाहित असून त्याला एक लहान मुलगा आहे.